breaking-newsराष्ट्रिय

‘विकासाच्या नावाखाली मानवी हक्क पायदळी तुडवले जातायत’- आर्चबिशप

पणजी : गोव्याचे आर्चबशिप फिलीप नेरी फेराओ यांनी आपल्या वार्षिक पत्रात राज्यघटना धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच विकासाच्या नावाखाली मानवी हक्कांना पायदळी तुडवलं जात असल्याचंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे. पत्रात फेराओ यांनी धर्मातील लोकांना राजकारणात सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन केलं असून राज्यघटना वाचवण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेण्याचा सल्ला दिला आहे.

“आपली राज्यघटना धोक्यात असल्यानेच अनेकांना असुरक्षित वाटत आहे. निवडणूक जवळ येत असल्या कारणानेच आपण आपली राज्यघटना समजून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणं गरजेचं असून, त्याची सुरक्षा करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे”, असं फिलीप नेरी फेराओ यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button