breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा-2019, निवडणुकीचे बिगूल वाजले, आचारसंहिता तत्काळ लागू

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून काही क्षणांत मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा तारखा जाहीर करतील. आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी 2014च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले असल्याचे अरोरा यांनी सांगितले. यावेळी जवळपास 90 कोटी लोक मतदान करणार असल्याची माहितीदेखिल अरोरा यांनी दिली.

तसेच, मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी 1590 वर फोन करा आपले नाव कळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर 80-90 वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुका कशा घ्यायच्या यासंदर्भात सर्व यंत्रणांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, विज्ञान भवन येथे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आयोगाकडून मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी सर्व बाबींची माहिती दिली. लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अरोरा म्हणाले, राजकीय पक्षांची चर्चा झाली आहे. दीड कोटी नोकरदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विविध राज्यांतील परीक्षांचाही मतदानाच्या तारखा नियोजित करण्यापूर्वी विचार करण्यात आला. यावेळी लोकसभेसाठी 10 लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवारांचा फोटोही असणार आहे असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button