breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी; प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड

मुंबई:  राज्यात उद्या म्हणजेच 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू होणार आहे. उद्यापासून तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिली तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.

दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button