राज्यघटनेत बदल करुन मराठ्यांना आरक्षण द्या – शरद पवार
कोल्हापूर – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, कोर्टाने ते आरक्षण रद्द केले. आता, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यासाठी विरोधकांशी मी बोलेन आणि माझ्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहिल, असे शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले. तसेच 15 वर्षात आम्ही काय केलं यावर बोलताना, 15 वर्षात आम्ही आरक्षण दिले, असेही पवार म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणावरुन आता मराठा नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी आहेत. सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे, असे म्हणत पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर येथूनच निशाणा साधला. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असेही पवार म्हणाले.