breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मोदी सरकारची उलटी गिनती सुरु-राज ठाकरे
नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा हेच सांगून जातो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. एवढंच नाही तर विजय मल्ल्या भारतात असतानाही पैसे देण्यास तयार होता मग त्याच्यावर पळून जाण्याची वेळ का आली? आणि नीरव मोदीबाबत केंद्र सरकार मिठाची गुळणी का धरून आहे ? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याची बातमीही नुकतीच आली आहे, त्यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.