breaking-newsराष्ट्रिय
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारने आगामी निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्याना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हमीभाव वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, तांदळासह इतर 14 पिकांचा समावेश आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटलनं वाढ करण्यात आली असून, 14 पिकांचा हमीभाव दीडपटीनं वाढवला आहे. त्यामुळे खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव प्राप्त होण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.