breaking-newsमनोरंजन

मैत्रीमुळे चित्रपटात काम मिळेल, अशी अपेक्षा करणं चुकीचं – कतरिना

कतरिना कैफसाठी येणारं वर्ष खूप महत्त्वाचं ठरणार आहे कारण येत्या काही महिन्यात तिचा बिग बजेट ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानीदेखील असणार आहे. खरं तर ‘भारत’ चित्रपटासाठी कतरिना ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. प्रियांकानं ऐनवेळी ‘भारत’ ला नकार दिल्यानं अली अब्बास जफरनं कतरिनाकडे चित्रपटात काम करण्याची विनंती केली आणि फारसे आढेवेढे न घेता तिनं चित्रपटाला होकार दिलाही.

या सर्वगोष्टीकडे ती कशी पाहते याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता यावर कतरिनानं मोठ्या सकारात्मतेनं उत्तर दिलं. अली अब्बास जफर माझा चांगला मित्र आहे त्यानं याआधी माझी निवड केली नाही याचं मला मुळीच वाईट वाटलं नाही. कारण मैत्रीत स्वार्थाची अपेक्षा ठेवणं खूपच चुकीचं आहे. तो मित्र आहे म्हणून मला चित्रपटात काम देईल असं गृहित चालणंही चुकीचं आहे. प्रियांकानं नकार दिल्यानंतर अली माझ्याजवळ आला, तुला माझ्यासोबत पुढे जायला आवडेल का? इतकाच प्रश्न त्यानं मला विचाराला तेव्हा त्याला कोणताही प्रतिप्रश्न न विचारता मी चित्रपटाला होकार दिला असं कतरिना म्हणाली.

सध्या कतरिना ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. यापूर्वी प्रियांका या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार होती. मात्र चित्रिकरण सुरू व्हायला एक आठवडा असताना तिनं अचानक नकार दिला. तिचं असं वागणं चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबरच सलमानलाही रुचलं नाही. त्यानंतर प्रियांकासोबत यापुढे कधीही काम करणार नाही खूणगाठ सलमाननं बांधली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button