breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मी नव्हे, जनताच शिरूरची किंगमेकर’, आमदार लांडगेंची बचावासाठी धडपड – दत्ता साने

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी तोडले आढळरावांचे लीड
  • आमदार महेश लांडगे यांना जनता नाकारत असल्याचा केला आरोप

पिंपरी, (महाईन्यूज) – गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासात भोसरी विधानसभा मतदार संघातून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे लीड तोडण्यात यश मिळाले नाही. मोदी त्सुनामी म्हणून सर्वत्र दवंडी ठोकणा-या आमदार, महापौर, संघटीका, पक्षनेता आदींची मक्तेदारी मोडीत काढून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना 50 हजाराचे मताधिक्य मिळवून दिले. शिरूर मतदार संघाचा किंग मेकर ‘मी नव्हे तर भोसरीतील जनताच आहे’, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी डॉ. कोल्हे यांच्या विजयाचे श्रेय जनतेला दिले. तसेच, आमदार महेश लांडगे हे आढळरावांच्या पराभवतून स्वतःचा बचाव करण्यासाठी 37 हजारांचे मताधिक्य मिळवून दिल्याचा कांगावा करत सुटले आहे, असा सणसणीत आरोपही साने यांनी केला आहे.

  • शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून ३७ हजाराचे मताधिक्य दिल्याचे ते सांगत आहेत. आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, ३३ नगरसेवक असूनही आढळरावांना केवळ ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. आम्ही विरोधात असूनही शिवसेनेचे मताधिक्य ५० हजारांनी कमी केले आहे. यातून भोसरीतील जनतेने शिवसेना-भाजपला नाकारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांच्या विजयाचे श्रेय मी लाटत नाही. लोकं मला शिरूरचा किंग मेकर म्हणत असले, तरी खरी किंगमेकर ही भोसरीतील जनताच आहे, असे साने यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असतानाही लोकसभेच्या निवडणुकीला शहरातून शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना आजपर्यंत मताधिक्य मिळत होते. मतदारसंघ एकत्रित असताना बारामतीतून शरद पवार साहेब उमेदवार असताना देखील भाजप उमेदवारांना भोसरी परिसरातून मताधिक्य मिळत होते. २००९, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचा होता. अनेक नगरसेवक, नगरसेविका होते. तरी, देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा शिवसेना-भाजपचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून ८७ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. आता परिस्थिती विरोधात असतानाही राष्ट्रवादीने ५० हजाराने शिवसेना-भाजपचे मताधिक्य कमी केले आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भोसरीचा आमदार, आजी-माजी महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, ३३ नगरसेवक आणि नगरसेविका एवढी ताकद असताना आढळरावांना केवळ ३७ हजारांचे मताधिक्य मिळते, ही लाजीरवाणी बाब आहे. तरीही, आमदारांकडून त्याचा ‘डंका’ पिटविला जात आहे. स्व:ताचे अस्तित्व टिकविण्यासाठी आमदार केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे साने यांनी म्हटले आहे.

  • भोसरीत विधानसभेत परिवर्तन अटळ
  • आमदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना भोसरीतील जनता आता वैतागली आहे. त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीतील मतदानातून आला आहे. त्यामुळे कोणीही मताधिक्य दिल्याची ‘दवंडी’ पिटवली तरी त्याचा विधानसभेला उपयोग होणार नाही. भोसरीत विधानसभेला नक्की परिवर्तन होणार असून त्यासाठी जनता सज्ज झाली आहे. भोसरीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास दत्ता साने यांनी व्यक्त केला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button