breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा आरक्षण ; भाजपने आश्वासनाची पुर्तता न केल्याने न्यायालयाचा घेतला आश्रय – डॅा. रत्नाकर महाजन

पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे पदाधिका-याचे राजीनामे मागे 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजपने निवडणुकीपुर्वी मराठांसह अन्य समाजाला दिलेली आरक्षणाची आश्वासने पुर्ण करता आलेली नाहीत. आता ते न्यायालयाच्या आड लपून आश्रय घेवू लागले आहेत. काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भाजपची होती. परंतू, ते आरक्षण मुद्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काॅंग्रेसचे प्रवक्ते डाॅ. रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 
 
पिंपरी चिंचवड शहर काॅंग्रेस पदाधिका-यांनी दिलेले राजीनामे मागे घेतल्याचे  त्यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी तसेच गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, सुदाम ढोरे, विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ, शाम अगरवाल, लक्ष्मण रुपनर, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, किशोर कळसकर, तानाजी काटे, सज्जी वर्की, ॲड. क्षितीज गायकवाड, मकरध्वज यादव, ॲड. अनिरुध्द कांबळे, उमेश खंदारे, हिरा जाधव, चंद्रशेखर जाधव आदींसह उपस्थित होते.
डाॅ.महाजन म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुरु असणा-या आंदोलनाला कॉंग्रेसने यापुर्वीच पाठींबा जाहिर केला आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाने मराठा आणि मुस्लिमांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे निवडणूक जाहिरनाम्यात आश्वासन दिले होते. वस्तूत: यापुर्वीच आघाडी सरकारने मराठा व मुस्लिमांना आरक्षण दिले होते. नंतर हा विषय न्यायालयात गेला व विधानसभा निवडणूक जाहिर झाली. तरी सुध्दा भाजपाने निवडणूक प्रचारात आरक्षणाचे आश्वासन दिले. याला चार वर्षे उलटून गेली. आता आरक्षणासाठी आंदोलनकर्ते शांतपणे रस्त्यावर येऊन आंदोलन करीत असतील तर त्यांच्याबाबत निंदा करुन, गैरप्रचार करुन, त्यांच्या हेतूवर शंका घेऊन, नालस्तीचा प्रचार करुन दिलेल्या आश्वासनांपासून पळून जाणे निषेधार्थ आहे.  तसेच शहर काॅंग्रेस पदाधिका-यांनी दिलेले राजीनामे मागे घेतल्याचे सांगून ते म्हणाले की, आगामी काळात कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने, नव्या उमेदिने, निश्चित उद्दिष्ठ गाठण्याच्या हेतूने कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरुन सर्व पदाधिका-यांनी आपले राजीनामे मागे घेतल्याचे सांगितले.
यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, शहर कार्यकारिणीने केलेल्या सुचनांबाबत प्रदेश अध्यक्षांसह सर्व पदाधिका-यांनी सकारात्मक भुमिका घेतली. त्यानंतर राजीनामे मागे घेण्यास सांगितल्यामुळे राजीनामा मागे घेतला. पुढील काळात अधिक जोमाने पक्ष संघटना वाढवू असे ते म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button