breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्राधिकरणातील साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावणार – सदशिव खाडे

  • खाडे यांनी प्राधिकरण अध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारली
  • प्रश्नांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

पिंपरी – शहरातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार केली जाणार आहे. घर देणारी संस्था अशीच प्राधिकरणाची ओळख निर्माण करणार आहे. प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी अनेक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या. त्यांचा साडे बारा टक्के परताव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भुमिपूत्र आणि कामगार यांच्यात समन्वय साधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही प्राधिकरणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी शुक्रवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिली.

 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सदाशिव खाडे यांनी आज शुक्रवारी (दि.7) स्वीकारली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी पुष्पगुच्छ देऊन खाडे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, माऊली थोरात, केशव घोळवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, संदीप कस्पटे, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे, सीमा सावळे,  योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, प्रियंका बारसे, महिला शहराध्यक्ष शैला मोळक, प्रवक्ते अमोल थोरात, राजू दुर्गे, अमित गोरखे यांच्यासह भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खाडे म्हणाले की, स्थानिक खासदार, आमदार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या बाबतीत लक्ष घालून लोकनियुक्त अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

 

प्राधिकरणाची स्थापना करताना पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीतील कामगारांना माफक किमतीत घरे मिळावी असा उद्देश ठेवण्यात आला होता. यासाठी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या जमीनी दिल्या असून जमिनीच्या मोबदल्यात स्थानिकांना साडेबारा टक्के परतावा देण्यात येणार आहे. तेरा वर्ष लोकनियुक्त अध्यक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरे आणि साडेबारा टक्के परतावा हे दोन्ही मुद्दे काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले.  त्यामुळे आगामी काळात याच दोन मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे, खाडे यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button