breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप-शिवसेनेने मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे घ्यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

पुणे – विधानसभेच्या निवडणुकींसाठी सुद्धा भाजप-सेनेने युती करून अडीच-अडीच वर्षांचा दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी केला. तसेच  बहुजन वंचित अाघाडी ही वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी अाघाडी असल्याचा अाराेपही त्यांनी केला.

पुण्यात अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. अाठवले म्हणाले,  दलित, बहुजन ही काॅंग्रेसची मते बहुजन वंचित अाघाडीमुळे काॅंग्रेसला मिळणार नाहीत, त्यामुळे त्याचा फायदा हा भाजपालाच हाेणार अाहे. 2019 ला भाजपाचंच सरकार सत्तेत येईल. येत्या निवडणुकींसाठी भाजप शिवसेनेने युती करावी.

विधानसभेच्या निवडणुकींसाठी सुद्धा भाजप-सेनेने युती करून अडीच-अडीच वर्षांचा दाेन्ही पक्षांचा मुख्यमंत्री करावा. लाेकसभेत अारपीअायचा काेणीही प्रतिनिधी नाही. मी राज्यसभेवर अाहे. त्यामुळे लाेकसभेत अारपीअायचे प्रतिनिधित्व असावे म्हणून मी लाेकसभेची निवडणूक दक्षिण मुंबईमधून लढविण्यास उत्सुक अाहे. सध्या ही जागा शिवसेनेकडे अाहे. भाजप शिवसेनेची युती झाल्यास ही जागा शिवसेना माझ्यासाठी साेडेल अशी अाशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button