breaking-newsराष्ट्रिय

बिहारमधील जागा वाटपाबाबत एनडीएची बैठक बोलवा – आरएलएसपीची मागणी

पाटणा – बिहार मधील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या घटक पक्षांची त्वरीत बैठक बोलावली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पार्टीन केली आहे. बिहार मध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत त्यातील 20 जागा भाजपने लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी उर्वरीत 20 जागा एनडीए मधील घटक पक्षांना दिल्या आहेत असे वृत्त प्रकाशित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने ही मागणी केली आहे.

या पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह हे मोदी सरकार मधील मंत्री असून त्यांनी अलिकडेच राजद बरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना माहिती देताना राष्ट्रीय लोकतांत्रिक समता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माधव आनंद यांनी सांगितले की बिहार मधील लोकसभेच्या जागावाटपाबाबतचे चित्र आत्ताच स्पष्ट होणे गरजेच आहे. त्यासाठी घटक पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक बोलावून त्यात चर्चा होणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की भाजप या राज्यात किती जागा लढवणार आहे हे त्यांनीच निश्‍चीत केले असल्याचे वृत्त आहे.

अशा स्थितीत एनडीएच्या घटक पक्षांना नेमक्‍या पक्षनिहाय जागा किती मिळणार आहेत हेही आम्हाला समजले पाहिजे यासाठी आम्ही या बैठकीची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button