breaking-newsराष्ट्रिय
जळगाव अॅट्रोसिटी प्रकरणी राहुल गांधींचे वादग्रस्त ट्विट
नवी दिल्ली : आंघोळ करुन विहीर बाटवली म्हणून मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगावमधील वाकडी येथे घडली आहे. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपावर निशाणा साधला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत राहुल गांधी यांनी भाजपा व आरएसएसवर हल्लोबाल चढवला आहे.
”महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे की, त्यांनी ‘सवर्ण’ समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. आरएसएस/ भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.