खडकवासला धरणातून साडेतीन हजार क्यूसेक पाणी सोडले
पुणे – खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 100 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने सकाळी आठ वाजता मुठा नदीत 2000 क्यूसेक पाणी सोडले आहे. त्यानंतर दहा वाजता 3424 क्यूसेक पाणी सोडले आहे.
दरम्यान, सकाळी पाउणे सात वाजता कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर, तांत्रिक सहायक डी एम. भागवत यांनी मुठा नदीचे पूजन करण्यात आले. पानशेत, वरसगाव, टेमघर धरणाचा परिसरात रविवारी रात्री जास्त पाऊस झाला. खडकवासला धरणात सकाळी 4000 तासाला दोन हजार क्यूसेकचा येवा आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीतून 3424 क्यूसेक व कालव्यात 400 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. याच पद्धतीने येवा राहिल्यास उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत खडकवासला धरण 100 टक्के भरेल. खडकवासला धरण परिसरापेक्षा पानशेत, वरसगाव, टेमघर धरणाचा परिसरात जास्त पाऊस आहे. या तीन धरणाच्या भिंतीच्यानंतर पडलेल्या पावसाचे पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. कालव्याच्या विसर्ग रात्री आठ वाजता 400 क्यूसेक करण्यात आला. कालव्यात पाणी सोडल्याने आता येवा नियंत्रण केला जात आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता 1000 क्यूसेक करण्यात येणार आहे.
दरम्यान, पावसाचा जोर सोमवारी सकाळी येवा कायम होता. ३५०० क्यूसेक पर्यंत पाणी नदीत सोडण्यात येत होते. येईल. येवा वाढल्यास उद्या सकाळी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढू शकते. पानशेत धरणात 73 वरसगाव येथे 46 व टेमघर धरणात 47 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, असे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.