कमकुवत काँग्रेस मुस्लिमांच्या फायद्याची नाही – असदुद्दीन ओवेसी
काँग्रेस राजकीय दृष्टया देशात कमकुवत होत आहे. अशावेळी मुस्लिमांनी आपले मत कुठे चालले आहे त्याचे आत्मपरिक्षण करावे असा सल्ला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसीं यांनी दिला आहे.
मुस्लीम आणि अन्य अल्पसंख्यांकाना काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना सोडायचे नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेस तितकी मजबूत राहिलेली नाही. या पक्षांकडून अपेक्षापूर्ती होणार नाही असे ओवेसी म्हणाले. महाराष्ट्रात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एआयएमआयएमचा खासदार निवडून आला आहे. किशनगंज लोकसभा मतदारसंघातही एमआयएमआयएम पक्षाला मोठया प्रमाणावर मते मिळाली आहेत.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना ओेवेसी यांनी वायनाडमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय मुस्लीमांचे आहे असे सांगितले. ते अमेठीमध्ये हरले. वायनाडमध्ये जिंकले. केरळच्या वायनाडमध्ये ४५ टक्के मतदार हे मुस्लीम आहेत असे ओवेसी म्हणाले.