breaking-newsराष्ट्रिय

इस्माचे केंद्र सरकारला पत्र : ऊस गाळपासाठी साखर कारखाने असमर्थ

नवी दिल्ली : देशभरातील साखर कारखान्यांनी आगामी गाळप हंगामासाठी असमर्थ असल्याचे म्हटले आहे. कदाचित ही पहिलीच वेळ आहे, की ज्यात भाव निर्धारित करण्यासाठी आणि किमान किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्यासाठी कालावधी मागितला जात आहे. कारण उसाची किंमत बेसुमारपणे वाढल्याचे म्हटले आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने इशारा दिला आहे, की एफआरपी मध्ये मागील आठ वर्षांत सुमारे ९६ टक्के वाढ झाली आहे. तर साखरेच्या किंमती मात्र मंदावलेल्या आहेत. यावर्षी देखील साखरेचे भाव २५-३० टक्के गडगडले आहेत.

१५ एप्रिलपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, उसाची थकबाकी सुमारे २१,६७५ कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे एकतर कारखाने बंद करावे लागतील किंवा दिवाळखोरीत काढावे लागतील, असा इशारा इस्माने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button