breaking-newsराष्ट्रिय

२०२५ पर्यंत पाकिस्तान भारताचा भाग असेल – आरएसएस नेता

२०२५ पर्यंत पाकिस्तान भारताचा भाग असेल असे वक्तव्य राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. ‘कश्मरी- आगे की राह’ या विषयावर एका सभेत बोलताना इंद्रेश कुमार यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

इंद्रेश कुमार म्हणाले की, ‘ तुम्ही लिहून ठेवा, पाच ते सात वर्षानंतर कराची, लाहोर, रावळपिंडी, सियालकोटमध्ये घर खरेदी आणि व्यवसायासाठी तुम्हाला संधी मिळेल. १९४७ च्या आधी पाकिस्तान नव्हता. लोक म्हणातात की, १९४५ पूर्वी तो भाग हिंन्दूस्थानात होता. २०२५ नंतर पुन्हा तो हिंन्दूस्थानात येणार आहे.’

युरोपीयीन खंडाच्या संकल्पनेप्रमाणे अखंड भारताची निर्मीती होईल. जिथे कोणत्याही सिमेची मर्यादा नसेल, असे म्हणत इंद्रेश म्हणाले की, बांगलादेशचे सरकारचाही याला पाठिंबा होता. ‘भारत सरकारने पहल्यांदा कश्मीरमध्ये सख्त पावले उचलली आहेत. कारण भारतीय लष्कर पॉलिटिकल विलपॉवर (राजनीतिक इच्छाशक्ती)वर चालतेय. सध्या राजनैतिक पॉवर चेंज झाली आहे. त्यामुळे आता लाहोरमध्ये जाऊ शकतो आणि कैलाश मानसरोवरला जाण्यासाठी चीनची परवानगी घ्यावी लागणार नाही. यूरोपीयन यूनियन प्रमाणे भारतीय यूनियनकडे जाण्याच्या मार्गावर आपण जाऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button