breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भर पावसात पीएमपी बसने घेतला पेट

पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या बसना (पीएमपी) आग लागण्याच्या प्रकारांना पूर्णपणे आळा घालण्यास प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. सोमवारी नरवीर तानाजी वाडी येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘पीएमपी’च्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

कोथरूड डेपो ते निगडी (मार्ग क्र. २८१) ही बस नरवीर तानाजी वाडी स्थानकावर पोहोचली असता, शॉर्टसर्किटमुळे बसच्या इंजिनच्या बाजूने पेट घेतला. ड्रायव्हर आणि कंडक्टरने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना सुखरूप बाहेर उतरवले आणि बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग पसरली नाही.

‘पीएमपी’च्या सर्वच गाड्यांमध्ये ही यंत्रणा अद्याप बसवलेली नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभारावर संचालक मंडळींनीही तोंड उघडलेले नाही, अशी टीका प्रवाशांनी केली. ‘पीएमपी’च्या ताफ्यात ८११ डिझेल आणि ५६३ सीएनजी अशा एकूण १३८२ स्वमालकीच्या, ६५३ भाडेतत्त्वावरील आणि २४ एसी ई-बस आहेत. गेल्या वर्षी बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने तज्ज्ञ प्रतिनिधींची जानेवारी २०१९ रोजी ‘फायर ऑडिट समिती’ स्थापन केली होती. या समितीने सुचविलेल्या नोंदी, निष्कर्ष आणि उपाययोजनांवर अंमलबजावणी केल्यामुळे गेल्या पाच महिन्यांत एकाही बसला आग लागली नाही. असे असतानाच सोमवारी आग लागल्याची घटना घडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button