breaking-newsमनोरंजन

इमरानने म्हटले होते ‘प्लास्टिक’; चार वर्षांनंतर ऐश्वर्याने दिले उत्तर

बॉलिवूडमध्ये कलाकारांमधील वाद काही नवीन नाहीत. कधी कधी एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद बऱ्याच वर्षांनी उमटतात. तर काही कलाकारांमधील नाती, मैत्री कायमची संपुष्टात येते. जवळपास चार वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने ऐश्वर्या राय बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्यावर आता ऐश्वर्याने उत्तर दिलं आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली, ‘माझ्याबाबतची अत्यंत वाईट टिप्पणी मी आजपर्यंत कोणती ऐकली असेल तर ती म्हणजे, मी खोटी आणि प्लास्टिक आहे.’ २०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ऐश्वर्याचा विषय सुरू असताना इमरानने तिला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. यानंतर सारवासारव करताना ‘मी ऐश्वर्याचा मोठा प्रशंसक असून, दोन वर्षांपूर्वी मस्करीत केलेल्या टिप्पणीसाठी मी तिची माफी मागणार आहे. यात काही व्यक्तीगत घेण्यासारखं नव्हतं,’ असंदेखील इमरानने सांगितलं होतं.

वाचा : ‘गली बॉय’च्या दमदार ट्रेलरनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

इमरानच्या या वक्तव्यानंतर ऐश्वर्याने मिलन लुथरियांचा ‘बादशाहो’ हा चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात इमरान आणि अजय देवगणची मुख्य भूमिका होती. दरम्यान, ऐश्वर्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनाही विचारण्यात आले आहे. त्यांनी होकार दिल्यास तब्बल ११ वर्षांनंतर सून आणि सासऱ्यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button