breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात फेरबदल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनात फेरबदलाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसात २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांची मुंबईत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद महसुली विभागाचे आयुक्त पी. एन. भापकर यांची पुणे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या पदावरील एस. एम. केंद्रेकर यांना भापकर यांच्या जागी औरंगाबाद विभागीय आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांची जळगाव जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एल. बिमनवार यांना वर्धा जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. वध्र्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन संचालक असलेले डी. बी. देसाई यांची कोल्हापूर जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील आदिवासी विभागात अप्पर आयुक्त असलेले एच. मोडक यांची वाशिमच्या जिल्हधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

दोन दिवसांत २० अधिकाऱ्यांच्या बदल्या

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी देशात आचारसंहिता लागू होणार आहे, त्या आधीच काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी ७ आणि शुक्रवारी १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button